पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

न पडणाऱ्या पावसाबद्दल काही निरीक्षणे

इमेज
  लोकसत्ताच्या २८ जून २०२२ च्या अंकात राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे. जून महिन्यात अपेक्षित असतो तसा पाऊस पडलेला नाही हे तर आपण सगळेच पाहत आहोत. वेगवेगळ्या शहरांत पाणी कपातीच्या घोषणा होत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार १ जून ते २७ जून ह्या कालावधीत महाराष्ट्रात १२० मिमी पाऊस पडलेला आहे. ह्या कालावधीतील पावसाची सरासरी आहे १८० मिमी. म्हणजे ह्या वर्षी महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा ३३% कमी पाऊस पडलेला आहे.   अशा संदर्भात मी उपलब्ध डेटाच्या आधारे पुढील प्रश्नाचा विचार केला आहे – जून महिन्यात कमी पाऊस होणं हे त्या वर्षीचा पूर्ण पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) कमी पाऊस होण्याशी किती निगडीत आहे? अर्थात ही मांडणी ढोबळ आहे आणि त्यात जरी भाकीत असले तरी ते प्रोफेशनल नसून हौशी आहे.  Climate Change Knowledge Portal इथे भारतातील राज्यांतील दरमहा पावसाची आकडेवारी उपलब्ध आहे. १९०१ ते १९२० अशा सुमारे १२० वर्षांतील प्रत्येक महिन्यातील पावसाची माहिती आहे. त्यावरून मी काही आकडेमोड केलेली आहे. प्रथम मी महाराष्ट्रात जून महिन्यात होणाऱ्या पावसाचा cumulative av...

अग्निपथ योजना – काही निरीक्षणे

इमेज
 ‘अग्निपथ ’ योजना आणि त्यावरून होणारा गदारोळ सध्या आपण अनुभवतो आहोत.  ह्या विषयाबाबतच्या चर्चेत उष्णता कमी होऊन पप्रकाश जास्त पडावा म्हणून ही योजना , तिची उद्दिष्टे , आणि परिणाम ह्यांची थोडक्यात मांडणी करत आहे. प्रतिमा - अमर उजाला         अग्निपथ योजनेचे आर्थिक उद्दिष्ट आहे ते संरक्षण दलांच्या खर्चात निवृत्तीवेतनावरील खर्चाचा वाढता वाटा कमी करणं. निवृत्तीवेतनावरील खर्चाचा वाटा कमी होणं म्हणजेच अन्य संरक्षणखर्च ,  विशेषतः आधुनिक तंत्रसामुग्री खरेदी, ह्याचा वाटा वाढण्याची शक्यता निर्माण होणं.  OPOP  च्या अंमलबजावणीनंतर (तिच्या गुणदोषांसह) निवृत्तीवेतन खर्च वाढलेला आहे आणि त्यावर उपाय म्हणून बव्हंशी किंवा काही प्रमाणात सैनिक आणि अधिकारी भरती ही त्यांना निवृत्तीवेतन द्यावे लागणार नाही अशा स्वरुपात व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे.        असे  optimization  करावे लागते ह्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे सरकारला, पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. आपण तितके संपन्न नाही, त्यामु...

आकडेवारी आणि लक्ष्य: मुंबईतील जून २०२२ ची कोव्हीड परिस्थिती

इमेज
     When a measure becomes a target, it ceases to be a good measure असं वाक्य धोरणांच्या बाबतीत वापरलं जातं. (Goodhart's law) आकडेवारी ही समस्या नसते , तर समस्येची निर्देशक असते. मूळ समस्येवर ईलाज होणे गरजेचे असते.            https://sketchplanations.com/goodharts-law        कोव्हीड महासाथीच्या मागच्या २ वर्षांत धोरणकर्त्यांना ही बाब लक्षात आलेली असावी. गंभीर रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळणे ही आपली समस्या आहे. गंभीर रुग्ण हे कोव्हीड रुग्णांच्या प्रमाणात वाढत असल्याने आपण कोव्हीड आकड्यांचा विचार करतो.   समाज म्हणून कोव्हीड आजार समूळ नष्ट करू पाहणे हे योग्य धोरणध्येय नाही हे आपल्याला कळलेले आहे. आपल्याला कोव्हीडसह जगावे लागणार आहे. कोव्हीडसह जगताना कोव्हीडने बाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना होणारा त्रास कमीतकमी असेल हेच कोव्हीडधोरणांचे मुख्य लक्ष्य असले पाहिजे. ह्याला अपवाद म्हणजे हॉस्पिटल क्षमता अपुरी पडू लागेल अशी चिन्हे निर्माण झाल्यावर लागणारे निर्बंध. अशी आणीबाणीची अवस्था नसताना कोव्हीड निर्बं...

कालचा काळोख आणि आजचे दिवे

इमेज
       रविवार २९ मे २०२२ च्या सुमारास र. धों. कर्वे ह्यांच्याबाबत आलेल्या लेखांच्या निमित्ताने सोशल मीडियात काही चर्चा झाली. ‘विवाहसंस्था आणि शरीरविक्रय व्यवसाय हे एकच आहेत’ अशा अर्थाच्या विधानाने बराच धुमाकूळ घातला. पाठीराखे आणि विरोधक ह्या दोघांच्याही मुद्द्यात असलेला क्षोभ, तिरकसपणा, किंवा भावनाहीन/राजकारणलेश बौद्धिक मांडणीचा अभाव असल्याने प्रकाश कमी आणि उष्णता जास्त अशीच अवस्था झाली. https://www.artforum.com/print/previews/201507/sam-lewitt-more-heat-than-light-54611        उपरोल्लेखित विधान हे ‘विवाहित स्त्री = सेक्सवर्कर स्त्री’ अशा अर्थाने अनेकांनी घेतले. तसेच आजच्या काळातील विवाहित स्त्री आणि आजच्या काळातील सेक्सवर्कर स्त्री ह्या सारख्याच आहेत असाही अर्थ लावण्यात आला. हे दोन्ही दृष्टीकोन चुकीचे आहेत. मुळातील विधान हे आजच्या काळातील परस्परपसंतीचे विवाह ज्या काळात अत्यंत नगण्य होते अशा काळातील समाजाला लागू पडणारे आहे. (माझ्या ह्या वाक्याचा अर्थ आज बहुतेक सारी लग्ने परस्पर निवड करून होतात असा नाही हे इथे वेळीच लक्षात घ्य...