पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

इमेज
 लोकसत्तात काहीसा संक्षिप्त लेख प्रकाशित झाला आहे. ( दुवा ) मूळचा लेख इथे देत आहे.  ‘ट्रॉली प्रॉब्लेम’ हा नैतिकशास्त्रातले एक उदाहरण किंवा संकल्पना आहे. तुमच्याकडे तर एक कृती करण्याची किंवा न करण्याची निवड आहे. केली तर ५ व्यक्ती वाचणार आणि १ मरणार आणि नाही केली तर १ वाचणार आणि ५ मरणार. तर तुम्ही कृती करणार का नाही हा तो ट्रॉली प्रॉब्लेम. हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर अशी बरीच शक्यता आहे कि तुम्ही कृती करण्याची निवड केली असेल. कारण १ व्यक्ती मरणे हे ५ व्यक्ती मरण्यापेक्षा बरे. ट्रॉली प्रॉब्लेमच्या अनुषंगाने आपल्याला मानवी वर्तनातील एक महत्वाची विसंगती दिसते. आपण आपल्या मनात आपल्या कुटुंबाच्या बाहेरील लोकांचे मूल्यमापन करताना संख्येने प्रभावित होत असतो. जितके जास्त लोकांचे नुकसान तितके ते अधिक लक्षवेधक ठरते. २५ जण मृत्युमुखी पडलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ही विसंगती आणि आपल्या काळाचा व्यवच्छेदक असा वेगविकार दिसून आलेला आहे.  अपघातातील बळींचा आकडा मोठा आहे ह्यामुळे त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियाही जास्त आहेत. पण असं म्हटलं तर असं म्हणणाऱ्यालाच लोक अपघाताचे गांभीर्य कमी