पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

त्रिपुरदमन सिंग ह्यांचे ‘ सिक्स्टीन स्टॉर्मी डेज’

इमेज
         हे तसं अगदी नवं पुस्तक नाही. पुस्तक प्रकाशित झाल्याला ६ महिने उलटून गेलेले आहेत. पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा लेखकाचा वेबि ना र श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फौंडेशनने ठेवला होता. तिथे लेखक सोडून सगळ्यांचा सूर ‘आली नेहरूंची पापे बाहेर’ असा होता. बदलत्या राजकीय ताकदीचे एक लक्षण म्हणजे अशी पुस्तके असा विचार करून मी पुस्तक लक्षात ठेवलं होतं.        मग एकदम दुसऱ्या टोकाच्या अमित वर्माच्या podcast मध्ये जेव्हा लेखक आला तेव्हा माझं पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढलं. आमच्या विरोधकांची लक्तरे असं प्रचारकी पुस्तक नसून त्यात काही मांडणी आहे हे त्या podcast मधून जाणवतं. काय आहे ही मांडणी ? तर – पहिली संविधानदुरुस्ती यायच्या सुमारे दीड वर्षे अगोदर भारतीय संविधान हे नागरीकांचे मूलभूत हक्क सर्वतोपरी मानणारे आहे होते. म्हणजे संविधानाचा अर्थ लावण्याची जबाबदारी असलेल्या न्यायालयांनी संविधान असे आहे असे वारंवार स्पष्ट केले होते. पहिल्या घटनादुरुस्तीने नागरिकांचे हक्क (ज्यांत प्रामुख्याने त्यांची स्वातंत्र्ये आहेत) हे दुय्यम महत्वाचे केले आणि त्यांवर निर्बंध आणायची क्षमता सरकारला दिली. भारताचे आजचे स