पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

त्रिपुरदमन सिंग ह्यांचे ‘ सिक्स्टीन स्टॉर्मी डेज’

इमेज
         हे तसं अगदी नवं पुस्तक नाही. पुस्तक प्रकाशित झाल्याला ६ महिने उलटून गेलेले आहेत. पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा लेखकाचा वेबि ना र श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फौंडेशनने ठेवला होता. तिथे लेखक सोडून सगळ्यांचा सूर ‘आली नेहरूंची पापे बाहेर’ असा होता. बदलत्या राजकीय ताकदीचे एक लक्षण म्हणजे अशी पुस्तके असा विचार करून मी पुस्तक लक्षात ठेवलं होतं.        मग एकदम दुसऱ्या टोकाच्या अमित वर्माच्या podcast मध्ये जेव्हा लेखक आला तेव्हा माझं पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढलं. आमच्या विरोधकांची लक्तरे असं प्रचारकी पुस्तक नसून त्यात काही मांडणी आहे हे त्या podcast मधून जाणवतं. काय आहे ही मांडणी ? तर – पहिली संविधानदुरुस्ती यायच्या सुमारे दीड वर्षे अगोदर भारतीय संविधान हे नागरीकांचे मूलभूत हक्क सर्वतोपरी मानणारे आहे होते. म्हणजे संविधानाचा अर्थ लावण्याची जबाबदारी असलेल्या न्यायालयांनी संविधान असे आहे असे वारंवार स्पष्ट केले होते. पहिल्या घटनादुरुस्तीने नागरिकांचे हक्क (ज्यांत प्रामुख्याने त्यांची स्वातंत्र्ये आहेत) हे दुय्यम महत्वाचे केले आणि त्या...