पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

कर्नाटकातील कॉलेजांतील बुरखा/हिजाब वादाच्या निमित्ताने

  कर्नाटकातले हिजाब (आणि नकाब/बुरखा , ज्याचा फारसा उल्लेख होत नाही. पण योग्य संज्ञा बुरखा हीच आहे. ट्विटरवरच्या क्लिप्समध्ये विद्यार्थिनी अंगभर आणि चेहरा झाकणारा बुरखा घालत आहेत हे स्पष्ट आहे.) हे प्रकरण गाजते आहे. मुलींच्या शिक्षणापुढे हिजाबचा मुद्दा गौण आहे आणि त्यामुळे त्यांना हिजाब घातल्याने कॉलेजात प्रवेश नाकारला जातो आहे हे चूक आहे – अशी एक सर्वसाधारण मांडणी आहे. अशा प्रकरणात असतं तसं आपल्याकडे स्पष्ट डीटेल्स नाहीत. कदाचित ते कधीही येणारही नाहीत. Most realistic possibility – बुरखा घालणं ही बाब अशा कॉलेजातील नियमित बाब (स्टेटस को) नव्हती. मध्येच केव्हातरी ही बाब सुरु झाली. हिंदू वर्चस्ववादी विचारसरणीच्या बाजूने हा बदल मुस्लीम identity चे public space मध्ये assertion अशा पद्धतीने घेतला. असे assertion हे त्यांच्या राजकीय भूमिकेच्या विरोधात असल्याने (भारतात केवळ हिंदूच असे assertion करू शकतात , अन्य नाही अशी भूमिका) त्यांनी ह्या बदलाला विरोध सुरु केलेला आहे. जर कॉलेजात गणवेश असेल तर गणवेशाच्या नियम आणि संकेताशिवाय अन्य बाबी निषिद्ध ठरतात. मुद्दा हा आहे कि अनेकदा अशा नियम आणि सं