पोस्ट्स

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

इमेज
 लोकसत्तात काहीसा संक्षिप्त लेख प्रकाशित झाला आहे. ( दुवा ) मूळचा लेख इथे देत आहे.  ‘ट्रॉली प्रॉब्लेम’ हा नैतिकशास्त्रातले एक उदाहरण किंवा संकल्पना आहे. तुमच्याकडे तर एक कृती करण्याची किंवा न करण्याची निवड आहे. केली तर ५ व्यक्ती वाचणार आणि १ मरणार आणि नाही केली तर १ वाचणार आणि ५ मरणार. तर तुम्ही कृती करणार का नाही हा तो ट्रॉली प्रॉब्लेम. हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर अशी बरीच शक्यता आहे कि तुम्ही कृती करण्याची निवड केली असेल. कारण १ व्यक्ती मरणे हे ५ व्यक्ती मरण्यापेक्षा बरे. ट्रॉली प्रॉब्लेमच्या अनुषंगाने आपल्याला मानवी वर्तनातील एक महत्वाची विसंगती दिसते. आपण आपल्या मनात आपल्या कुटुंबाच्या बाहेरील लोकांचे मूल्यमापन करताना संख्येने प्रभावित होत असतो. जितके जास्त लोकांचे नुकसान तितके ते अधिक लक्षवेधक ठरते. २५ जण मृत्युमुखी पडलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ही विसंगती आणि आपल्या काळाचा व्यवच्छेदक असा वेगविकार दिसून आलेला आहे.  अपघातातील बळींचा आकडा मोठा आहे ह्यामुळे त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियाही जास्त आहेत. पण असं म्हटलं तर असं म्हणणाऱ्यालाच लोक अपघाताचे गांभीर्य कमी

विसंगत प्राणीदयेची समस्या

 २६ जून २०२३ च्या लोकसत्ता मध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येबद्दल विश्लेषणात्मक लेख आहे. लेखातला गोंधळात टाकणारा प्रकार म्हणजे भारतात प्रचंड प्रमाणात कुत्र्यांचे अवांछित चावे ही समस्या सुरुवातीला मांडून पुढे हे चावे ही माणसांचीच कशी चूक आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे भटके कुत्रे नव्हे तर राहती माणसे हीच समस्या असा तो लेख होतो. अर्थात प्राणीमित्र नावाच्या प्रजातीचा दृष्टीकोन प्रातिनिधिकदृष्ट्‍या मांडणारा लेख असं पाहिलं तर ही विसंगती नसून गुणधर्म आहे हे लक्षात येतं. (पण हा वोक लेख नाही हा. असा आळ येऊ नये म्हणून सुरुवातीलाच सरमाच्या उल्लेखाची तीट लावलेली आहे.) मुळात भटक्या कुत्र्यांची समस्या नाही. समस्या त्यांच्याबद्दल चुकीचे धोरण असण्याची आहे. भटके कुत्रे रस्त्यावर नसणे हेच सामाजिक धोरणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे भटक्या कुत्र्‍यांना त्यांच्यासाठी चालवण्यात येणाऱ्या shelters दाखल करणे आणि तिथे स्वयंसेवी संस्थांनी त्यांची काळजी घेणे, shelters मधील पात्र प्राणी हे ज्यांना प्राणी पाळायचे आहेत त्यांनी आपल्या घरी नेणे, आणि जे भटके कुत्रे shelters मध्ये राहू शकत नाहीत अशांना म

कोव्हीडची ३ वर्षे: काही निरीक्षणे

इमेज
  कोव्हीडची आणि आपली गाठभेट झाली त्याला ३ वर्षे झाली. ह्या ३ वर्षांबद्दल ही काही निरीक्षणे आहेत. source: internet १.       कोव्हीडच्या ज्या लक्षणीय आठवणी असणार आहेत त्यातली एक आहे लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेला तयार व्हायला वेळ मिळाला. हे लॉकडाऊनचं यश. २.       लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित, रोजंदारीवर अवलंबून कुटुंबे ह्यांची हानी करून बाकी लोकांना वाचवलं गेलं. म्हणजे असं करणं हे लॉकडाऊनचं उद्दिष्ट नव्हतं , पण त्याच्या परिणामांकडे अशा प्रकारे बघता येईल. ही हानी भरून काढण्याचे प्रयत्नही नंतर झाले आणि ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. पण मार्च , एप्रिल , आणि मे २०२० मध्ये भारतातला एक वर्ग लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले त्यात भरडला गेला आणि बाकीचे त्या वेळी कोव्हीड लाटेत सापडण्यापासून वाचले. ३.       अर्थात जगभरातच तेव्हा flatten the curve अशा धोरणांचे वातावरण होते. विषाणू उत्क्रांत होणं , लस हे टप्पे भाकि‍तांच्या कक्षेतही नव्हते. प्रसाराचा वेग कमी करणं ह्यापलीकडे धोरण म्हणून पर्यायही नव्हते. हा वेग कमी करण्यासाठी किती तीव्रतेचे निर्बंध आवश्यक होते हा मुद्दा वादाचा असू शकतो, उदाहर

कसबा पेठ पोटनिवडणूक: मत न देऊन अवलक्षण?

इमेज
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप हरला. भाजप कोणतीही निवडणूक प्रचंड हिरीरीने लढत असल्याने भाजपची कोणतीही हार हा कुतूहलाचा विषय बनते. कसबा पेठ पोटनिवडणूक त्याला अपवाद नाही. प्रतिमा: इन्टरनेट  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत , ज्यांत भाजप आणि त्यावेळची शिवसेना हे स्वतंत्र लढले होते तेव्हा कसबा पेठ मतदारसंघात भाजपला ७३५९४ मते मिळाली होती आणि शिवसेनेला ९२०३. २०१९ विधानसभेला युती असताना युतीच्या उमेदवाराला ७५४९२ मते मिळाली होती. २०२३ च्या पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेली मते आहेत ६२३९४. २०१९ च्या तुलनेत १७% मते भाजपला कमी पडली. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांना २०१४ मध्ये मिळून ४७१८७ मते होती आणि २०१९ मध्ये ४७२९६. पोटनिवडणुकीत त्यांना ७३३०९ मते पडली आहेत. म्हणजे त्यांची मते ५५% ने वाढली आहेत. ही वाढ केवळ ठाकरे गट सोबत आल्याची नाही. २०१४ ची शिवसेनेची मते पूर्णतः ठाकरे गटाची होती असं पकडलं तरी मतातील वाढ त्याहून जास्त आहे. भाजप, सेना , कॉंग्रेस , आणि राष्ट्रवादी ह्यांच्याशिवाय अन्य अशी मते २०१९ ला २९२८१ होती , ती २६७८ एवढी घटली आहेत. कॉंग्रेसची, म्ह

सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक हित, आणि न्यू नॉर्मल

इमेज
  डॉ. अजित कानिटकर ह्यांचा ‘ गणेशोत्सव ‘न्यू नॉर्मल ’ करता येईल का?’ हा लेख २८ ऑगस्ट २०२२ च्या लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला आहे. उपरोध आणि पर्यायी मांडणी ह्यातून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सध्याची म्हणजे ‘नॉर्मल ’ स्थिती ही वाईट आहे हे स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या मताशी महाराष्ट्रातील अनेकजण मागची अनेक वर्षे सहमत असतील. अशा अनेकांची भूमिका मांडल्याबद्दल डॉ. कानिटकर ह्यांचे अभिनंदन. स्त्रोत   त्यांच्याच मांडणीला पुढे नेऊन थोड्या अधिक स्पष्ट शब्दात सार्वजनिक गणेशोत्सवातून होणारी सामाजिक मूल्यनिर्मिती ही अत्यंत क्षुल्लक असून केवळ आर्थिक आणि राजकीय हेतूंसाठी सार्वजनिक सुविधांवर ताण आणणारा सार्वजनिक गणेशोत्सव चालतो असं मी म्हणणार आहे. त्याचे हे बदललेले स्वरूप लक्षात घेऊन त्याच्याबद्दलची धोरणेही बदलली जावीत आणि आपले आकलनही बदलावे अशी माझी मांडणी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात थोर नेत्यांनी लोकांमध्ये जागृती , प्रबोधन व्हावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असं आपण शालेय वयापासून ऐकतो. आता रात्री १० वाजले कि केव्हा विसर्जन मिरवणुकीतील आवाज थांबेल ह्याची प्रतीक्षा करताना मला मला न य