पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक हित, आणि न्यू नॉर्मल

इमेज
  डॉ. अजित कानिटकर ह्यांचा ‘ गणेशोत्सव ‘न्यू नॉर्मल ’ करता येईल का?’ हा लेख २८ ऑगस्ट २०२२ च्या लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला आहे. उपरोध आणि पर्यायी मांडणी ह्यातून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सध्याची म्हणजे ‘नॉर्मल ’ स्थिती ही वाईट आहे हे स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या मताशी महाराष्ट्रातील अनेकजण मागची अनेक वर्षे सहमत असतील. अशा अनेकांची भूमिका मांडल्याबद्दल डॉ. कानिटकर ह्यांचे अभिनंदन. स्त्रोत   त्यांच्याच मांडणीला पुढे नेऊन थोड्या अधिक स्पष्ट शब्दात सार्वजनिक गणेशोत्सवातून होणारी सामाजिक मूल्यनिर्मिती ही अत्यंत क्षुल्लक असून केवळ आर्थिक आणि राजकीय हेतूंसाठी सार्वजनिक सुविधांवर ताण आणणारा सार्वजनिक गणेशोत्सव चालतो असं मी म्हणणार आहे. त्याचे हे बदललेले स्वरूप लक्षात घेऊन त्याच्याबद्दलची धोरणेही बदलली जावीत आणि आपले आकलनही बदलावे अशी माझी मांडणी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात थोर नेत्यांनी लोकांमध्ये जागृती , प्रबोधन व्हावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असं आपण शालेय वयापासून ऐकतो. आता रात्री १० वाजले कि केव्हा विसर्जन मिरवणुकीतील आवाज थांबेल ह्याची प्रतीक्षा करताना मला मला न य