रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे
कल्याण-डोंबिवलीत २ जुलैपासून सुरू असलेले लॉकडाऊन १९ जुलैला संपणार आहे. ह्याआधी ते
१२ जुलैला संपणार होते. पण ११ जुलैला ते अजून सात दिवस वाढवले गेले. ११ आणि
१२ जुलैला अनुक्रमे ६१५ आणि ६६१ केसेस आल्याने हा निर्णय योग्यच वाटला.
त्यानंतर २ दिवस,
सोमवार १३ जुलै,
मंगळवार १४ जुलै,
केसेस पडत्या होत्या,
अनुक्रमे ४२७ आणि ३३६. मग मग २ दिवस त्या परत वाढत आहेत. शुक्रवार-शनिवारी महानगरपालिका लॉकडाऊन वाढवायचा कि नाही हा निर्णय घेईल.
निर्णय हे पुराव्यांवर आधारित असावेत,
भावनांवर नाही. कोव्हीड-१९ च्या बाबतीत पुरावे म्हणजे आकडेवारी. पण आकडेवारी
ही केवळ आहे तशी बघून चालत नाही.
उदाहरणार्थ- २ जुलैच्या लॉकडाऊनचा फरक पहायचा असेल तर कोणत्या तारखेपासून
पाहावा?
आता २ जुलैला एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाव्हायरसने शिरकाव केला तर ८
जुलैला आपण टेस्ट करून घ्यावी अशी लक्षणे दिसायची शक्यता आहे. मग टेस्ट
करायची तयारी आणि त्याचा positive
निकाल मिळायला पुढचे काही दिवस . म्हणजे साधारण १० दिवसांनंतर अशा
व्यक्तीच्या शरीरातील विषाणू आपल्याला आकड्यातून कळेल. जसे खगोलशास्त्रात
आपल्याला दिसणारा तारा हा काही शे-हजार वर्षांपूर्वीच्या अवस्थेत दिसतो तसं
आपलाल्या दररोजच्या आकड्यातून काही दिवस अगोदरपर्यंतचा कोव्हीडचा प्रसार
कळतो.
अर्थात जर व्यक्ती मनाप्रमाणे तपासणी करून घेऊ शकली तर हा १० दिवसांचा
कालावधी कमी होईल. पण अजून आपण त्या अवस्थेत आलेलो नाही.
तर २ जुलै पासून कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या लॉकडाऊनचा प्रभाव कळायचा
असेल तर १२ जुलै पासूनचे आकडे पहावे लागतील.
मी सोबत दोन ग्राफ जोडले आहेत.
|
|
आकृती-१ |
|
|
आकृती-२ |
निळ्या रंगाची रेषा आहे तो आहे मुख्य अंदाज. त्याच्या भोवती
दिसणारा पट्टा हे दाखवतो कि जरी ह्या पट्ट्यातील एखादी संख्या आली तर ती
मुख्य अंदाजासारखीच मानावी लागेल. आकृती-१ नुसार १२ जुलैची आकडेवारी
अंदाजाहून जास्त आहे. पण त्यानंतर चारही दिवस ती अंदाजाहून कमी आहे. १५ आणि
१६ जुलैला ती पट्ट्यात, मुख्य अंदाजाजवळ आलेली आहे, पण खालच्या बाजूला
आहे.
एक गोष्ट इथे नोंद करायला हवी कि लॉकडाऊनच्या काळात स्क्रीनिंग सुरू झालेले आहे. स्क्रीनिंगमुळे काही दिवसांनी सापडले असते असे रुग्ण अगोदर सापडतात. स्क्रीनिंगमध्ये संशयित रुग्णाची पहिले antigen टेस्ट होईल, त्यात कोव्हीड-१९ ची शक्यता आढळल्यास मुख्य टेस्ट होईल. म्हणजे २-३ दिवसांत निकाल येईल. माझ्या माहितीतील रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे स्क्रीनिंग ७ जुलैपासून सुरू झाले. म्हणजे ९ जुलैपासून तरी त्यात सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा दिसायला हवा. त्यामुळे १२ जुलैपासून दिसणाऱ्या आकड्यांत हे स्क्रीनिंगमुळे आलेले आकडेही आहेत.
थोडक्यात जर स्क्रीनिंगमध्ये बरेच रुग्ण सापडत असतील तर लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा वेग घटला आहे असे म्हणायला वाव आहे. माझ्या स्वतःच्या मते हीच शक्यता आहे.
एक अजून मुद्दा, ज्याची माहिती मला वैयक्तिक रित्या आहे, ती
म्हणजे लॉकडाऊनमुळे उद्भवणारा लोकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न. एप्रिल-मे
महिन्यांत कल्याणातील काही वस्त्यांत धान्यवाटप करण्याच्या निमित्ताने माझा
काही लोकांशी दूरध्वनीवरून संपर्क झाला होता. त्यातील दोघांनी मला मागच्या
२ दिवसांत परत संपर्क केलेला आहे - आमच्याकडे धान्य नाही, काही मदत कराल का
म्हणून!
ह्या सगळ्याचा विचार करता मी लॉकडाऊन वाढवायचे का नाही हा निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना मी पुढील गोष्टी सुचवू इच्छितो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा